सुप्रसिद्धलेखिका मधुवंती सप्रे यांनी लिहिलेले ‘कवितेचा मर्मबंध’ हे समीक्षात्मक पुस्तक‘बुकगंगा पब्लिकेशन्स’तर्फे आज २४ डिसेंबर २०२१ ला प्रकाशित होत आहे.
या पुस्तकातबा. सी. मर्ढेकर,ग. दि. माडगूळकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, इंदिरा संत, मंगेशपाडगावकर, आरती प्रभू, मुक्ताई,बालकवी, बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांवरआस्वादक समीक्षात्मक लेखन केले आहे.
कवितेमधे अनेकविषय सामावतात.निसर्ग, देश, समाज,विपन्नावस्था, परकाया प्रवेशातून घेतलेली अनुभूती,मन विषण्ण करणाऱ्या घटना. हे सर्वकाही मराठी कवितेतविस्ताराने आलेलं आहे. मराठीत काही कवींनी कवितेत वेगवेगळे प्रयोगकेले. त्यामुळेही अन्य कवीवर्गाला एक नावीन्याची दिशा मिळत गेली.जातीवृत्त सुनीत, ओवी, दिंडी,अभंग या पारंपरिक चौकटीतून बाहेर पडून मराठी कविता दशदिशांना झेपावली.प्रत्येक कवीची कवितेकडे पाहण्याची धारणा ही त्याच्या अनुभवविश्वावर,सामाजिक परिस्थितीवर आणि मिळालेला अनुभव किती खोल रुजला आहे यावर अवलंबूनअसते. केशवसुतांनी म्हटल्याप्रमाणे दिक्कालातून आरपार पाहण्याचीदृष्टी ज्या कवींना लाभते. त्यांची कविता विलक्षण असते. कवितेत शब्दांचं महत्त्व अनन्यसाधारण असतं. ते शब्दचअर्थ आशयाच्या अनेक छटा, अनेक पदर, अनेकस्तर आपल्या पुढे उलगडतात. हे कवी, वाचकांचेआवडते असल्याने, त्यांच्या कवितेचं केलेलं विश्लेषण वाचकांनाआवडेलच अशी खात्री आहे. या पुस्तकाचे दोन भाग आहेत. पहिल्या भागात प्रेमकविता आणि दुसऱ्या भागात विचार आणि निसर्ग या संबंधीच्याकविता आहेत.
बुकगंगा.कॉम वरून ‘कवितेचा मर्मबंध’ याचे पुस्तक आणि ई-बुक विकतघेण्यासाठी खाली डीटेल्स दिलेले आहेत-